वारंवार निवेदन देऊन पण गोदावरी नदीच्या संरक्षण रेलिंगचे काम केले नाही

वारंवार निवेदन देऊन पण गोदावरी नदीच्या संरक्षण रेलिंगचे काम केले नाही
कोपरगाव :- प्रतिनिधी
येत्या पंधरा तारखेला महाशिवरात्र उत्सव आहे गोदावरी नदीवरील पुलावरून सातत्याने हजारो लोकांचे आवा गमन चालू असते त्यात बेट भागांमध्ये दोन मोठी धार्मिक स्थळ आहेत परम सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज मंदिर व राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज मंदिर या दोन्ही ठिकाणी शिवरात्रीनिमित्त लाखो भाविक दर्शन घेत असतात यातील बहुतांश भाविक याच गोदावरी नदीवरील पुलावरून या मंदिराकडे येत असतात अशातच या पुलावरील रेलिंग अर्थात तुटलेली रेलिंग एखाद्या भाविकांचे प्राणही घेऊ शकते नकळत जर कोणी नदी पात्रात पडले तर याला जबाबदार कोण म्हणूनच माझी कोपरगाव नगरपरिषदेला विनंती आहे लवकरात लवकर आपण या पुलावरील तुटलेल्या रेलिंग चे काम करावे
सार्वजनिक बांधकाम विभाग ज्यावेळेस नगर परिषदेला पूल हस्तांतरित करेल त्यावेळेस काम करण्याचा जर मानस नगर परिषदेचा असेल तर या कालावधीमध्ये जर काही अपघात झाला एखादी जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण नगरपरिषद असेल कस सार्वजनिक बांधकाम विभाग असेल?
गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट च्या वतीने नगरपालिका मुख्याधिकारी आणि कोपरगाव तहसीलदार साहेबांना प्रत्यक्षा भेटून निवेदन दिले होते सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केले होते




