22 मार्च, जागतिक जलदिनी स्वतःचे मुंडन करुन उल्हास नदीच्या दूषित पाण्यात, जलपर्णीमध्ये उभे राहून बेमुदत आंदोलन सुरु..

22 मार्च, जागतिक जलदिनी स्वतःचे मुंडन करुन उल्हास नदीच्या दूषित पाण्यात, जलपर्णीमध्ये उभे राहून बेमुदत आंदोलन सुरु…..!
22 मार्च, जागतिक जलदिनी स्वतःचे मुंडन करुन उल्हास नदीच्या दूषित पाण्यात, जलपर्णीमध्ये उभे राहून बेमुदत आंदोलन सुरु..
गेल्या 8 वर्षांपासून उल्हास नदी प्रदूषणमुक्त व्हावी, ठाणे, कल्याण, डोम्बिवली, उल्हासनगर व अन्य 80 लाख लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून अनेक आंदोलने केली गेली, परंतु प्रत्येकवेळी शासन व प्रशासनाने लेखी व तोंडी आश्वासने देऊन फसवणूकच केली आहे,
त्यामुळेच 22 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून शासन व प्रशासनाचा निषेध म्हणून स्वतःचे मुंडन करून आंदोलनाला सुरुवात झाली आहे,
दररोज उल्हास नदीच्या दूषित पाण्यात, जलपर्णीमध्ये उभे राहून बेमुदत हे आंदोलन केले जाणार आहे.
उल्हास नदीत लागणारे सर्व प्रदूषित सांडपाण्याचे नाले हे तातडीने बंद व्हावेत, उल्हास नदी जलपर्णीमुक्त व्हावी, मोहोने बंधाऱ्याच्या काही मीटर अंतरावर अगोदर एक नवीन बंधारा बांधण्यात यावा व सद्यस्थितीत असलेल्या मोहोने बंधाऱ्याजवळ सांडपाण्याचा मैला व अशुद्ध केमिकलयुक्त गाळ काढण्यात यावा, दूषित उल्हास नदीचे अतिरिक्त पाणी मराठवाड्याला देण्यासाठी कोणतीही योजना असेल तर ती रद्द करावी कारण आपल्याकडेच भीषण पाणीटंचाई आहे, त्यातही पाण्यासरखा धर्म नाही, परंतु कुणाला पाणी द्यायचेच असेल तर शुद्ध पाणी द्यायला हवे,
अश्या मागण्या करीत
मी कल्याणकर सामाजिक संस्था, कंडोमपा पूर्व नगरसेवक नितिन निकम, उमेश बोरगांवकर, कैलास शिंदे समेत उल्हास वालधुनी नदी संवर्धन संस्था व अनेक सामाजिक संस्था यांचे द्वारे 22 मार्च, सकाळी 10 वाजल्यापासुन मोहोने नाला येथे उल्हासनदी मध्ये बसुन बेमुद्दत आंदोलन सुरु राहिल.