Breaking
ब्रेकिंग

उल्हास नदितुन 5000 कांबा वासियांना विना फिल्टर दुषित पाणी…!

0 0 8 3 2 8

उल्हास नदितुन 5000 कांबा वासियांना विना फिल्टर दुषित पाणी..

उल्हास नदितुन 5000 कांबा वासियांना विना फिल्टर दुषित पाणी..

कांबा सकट 5 गावातील नागरिकांत आज़ारपणा चे लक्षण..
जलपर्णी चे योग्य व्यवस्थापन न झाल्यास तीव्र आंदोलन..

सम्पुर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी कल्याण मुरबाड रोड येथील रायते वरप कांबा म्हारळ गाव सिमेतुन वाहते,
गेल्या काही वर्षात केमिकल, रसायन व सांडपाणी सोडल्या मुळे उल्हास नदी ही प्रदूषित झाली आहे, सर्व दूर जलपर्णी पसरली आहे, नदितील मासे, जीवजंतु मरण पावत असुन त्यांची दुर्गन्धी उल्हास नदितील पाण्यात पसरत आहे,
गेली 25 वर्षे प्रशासना द्वारे उल्हास नदितिल पाणी विना फिल्टर केल्या कांबा, पांचवा मैल, नवथरपाडा, वाघेरापाडा, पावशेपाडा येथील 5 गाव व पाडे येथील जवळपास 5000 नागरिकांना दैनंदिन उपयोगा साठी पुरवठा करीत आहे,


कोठल्याही प्रकारे फिल्टर व ट्रीटमेंट न करता उल्हास नदी चे दुषित पाणी नागरिकांना दिले जात असल्यामुळे त्वचारोग व अन्य शारीरिक व्याधि आणि गम्भीर आज़ार त्यांना भेड़सावत आहेत,
लवकरच प्रशासनाने गम्भीर दखल घ्यावी व 5000 कांबा वासियाच्या हक्काचे शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे, अशी मागणी ग्रामस्थ व उल्हास नदी बचाओ कृती समिती कार्यकर्ते निकेश पावशे यानी केली आहे,
लवकरच व्यवस्था न झाल्यास ग्रामस्थाना तीव्र आंदोलन करावे लागेल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 3 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे